गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

कृतज्ञता

एका प्रसिद्ध लेखकाचं पुस्तक वाचताना एक सुंदर वाक्य वाचलं.... 'कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण, हा आयुष्यातला मोठा क्षण असतो... ' त्या क्षणापासून कुणालाही वंचित करू नये...'  वाक्य वाचलं, आणि अगदी पटलं मनापासून... खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो का आपण प्रत्येकवेळी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल किंवा आपल्याजवळच्या व्यक्तींबद्दल... नाही करत आपण असं ... आपण गृहीत धरतो कितीतरी गोष्टी ... आज वाक्य वाचल्यावर आठवलं माझ्या आजीचं वाक्य... ती नेहमी म्हणायची , देवाने तुम्हाला धडधाकट बनवलं आहे .. हातपाय नाक डोळे सगळं नीट आहे याबद्दल त्याचे आभार मानावेत... आज आठवू लागले की आयुष्यातल्या कितीतरी व्यक्तींचे आणि गोष्टींचे आभार मानायला हवे आहेत मी .... माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती , आई -बाबा , माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील माझे मित्रमैत्रिणी, शिक्षक, नातेवाईक, भावंडं, अनेक अनामिक व्यक्ती ज्यांनी वेळप्रसंगी मला घडवलं होतं , सावरलं  होतं , सांभाळून घेत माझ्या चुकांना सुधारायला मदत केली होती... लहानपणापासून मला वेळोवेळी या सगळ्यांनी अनेक प्रसंगात साथ दिली होती त्यांचे आभार इ खरंच मानलेत का? नसतील मानले तर अजूनही वेळ नाही गेलेली... आपणा सगळ्यांच्या आयुष्यात हि वेळ उशिरा येऊ नये... त्या त्या वेळी आपण आभार कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि आता मी ती करत राहणार कायम... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा