मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

जीवनातली रंगपंचमी

                   जीवनातली रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या सहभागामुळे, विविध रंगांमुळे....!!! आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्यात सामील होतात.... आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात...... प्रत्येकाचे रंग निराळे....!!!
              मग हे रंग कधी शहाणपणाचे कधी वेडेपणाचे; कधी उत्साहाचे तर कधी नैराश्याचे... कधी शांततेचे...धीरगंभीरतेचे....आतुरतेचे तर कधी विरहाचे.......अशी ही आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांनी सजलेली रंगपंचमी आपल्या आयुष्यात कधी आपल्याला हसवते...कधी रडवते...खिन्नता आणते...विचार करायला लावते... विचारहीन बनवते... कधी अपराधी बनवते...हतबल बनवते... संयमी बनवते.... अचानक गप्प बसवते...आणि या विविध मानवी भावनांच्या कल्लोळात अचानक एकटं पाडते.... पुढच्याच क्षणी आपल्या एखादया दडवून ठेवलेल्या आठवणींचं रान मोकळं करते, अन् मग सुरु होतो पुन्हा एक लढा.... भूतकाळ आणि वर्तमानात दोलायमान झालेल्या मनाचा.... आणि पुन्हा त्या मनाला सावरण्याचा....!!! मात्र या सगळ्यातून एक मानवी मन किती अन् काय काय शिकतं, जे आयुष्यभराची शिदोरी म्हणून कायम रहातं........ एक माणूस म्हणून घडताना......!!!!

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

संवेदनशीलता

संवेदनशीलता जपणं.... खरचं खूप त्रासदायक असतं अनेकवेळा...!!! उत्कटतेने व्यक्त केलेल्या भावना... मग त्या आनंदाच्या, निराशेच्या, विरहाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या.....इतक्या उत्कटतेने व्यक्त कराव्यात का नाही हा प्रश्ण मनात निर्माण होतो.... खोल जपलेली प्रत्येक भावना व्यक्त नाही झाली तरी अस्वस्थता जाणवतं रहाते हे त्याचचं लक्षण नाही का???ती भावना व्यक्त करताना जर समोरची व्यक्ती तितक्याच उत्कटतेने तो भाव जाणू शकली तर सोन्याहून पिवळं.....!!!! पण जर नाही जाणू शकली तर मात्र कायम एक बोच मनात रहाते की आपण ज्या व्यक्तीला विश्वासाने, हक्काने काही सांगू इच्छितो पण ती व्यक्ती त्यापासून कोसों दूर आहे या भावविश्वापासून.... तिला आपली साद ऐकू जात नाही....आणि उरते फक्त खोलवर निराशा.... संवाद तुटल्याची भावना.....अधूरा रहाणारा संवाद....सहजपणे निर्माण झालेला उत्कट भाव; आणि तितक्याच सहज अधुरा राहिलेला तो संवाद........ कधीच पुर्ण न होणारा......!!!!