बुधवार, १८ जानेवारी, २०१७

निरोप

' निरोप घेणं ' किंवा ' निरोप देणं ' खरंच सोप्पं असतं का? निरोप देताना किंवा घेताना मग डोळे का पाणवतात? निघता निघता पाय मागे का घुटमळतात ? पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त का होतात? खूप आवरून देखील आठवणी फितूर का होतात आणि मनाचा बांध का फुटतो?? किती अवघड वाटतं अशा वेळी??
      आपल्याच आवडत्या व्यक्तीचा निरोप कधीतरी नियती आपल्याला घ्यायला लावते, तर कधी आपलचं माणूस अचानकपणे आपल्यापासून इतकं दूरं जातं कीआपल्यालाच कळत नाही, काय झालं अन, कसं झालं ते?...त्या वेळी मनात निर्माण होणारी कंपनं .... मनाची तगमग... अवघडलेपण , सैरभैर झालेलं मन  आणि हतबल झालेले आपण... कधी कधी निरोप घेतलेल्या व्यक्ती त्यांच्या आठवणींचा निरोप मात्र घेऊ देत नाहीत मनाला.... अन, मग मनाची ती दोलायमान स्थिती सावरता सावरता कठीण होतं ...   ' या आठवणींचा , या व्यक्तीचा आपण निरोप घेतलाय आपण ' हे बजावून देखील मन मात्र पुन्हा पुन्हा त्याच आठवणीत गुंतत राहतं ... इतकी अवघड असते का निरोपाची वाट...???