शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

संवेदनशीलता

संवेदनशीलता जपणं.... खरचं खूप त्रासदायक असतं अनेकवेळा...!!! उत्कटतेने व्यक्त केलेल्या भावना... मग त्या आनंदाच्या, निराशेच्या, विरहाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या.....इतक्या उत्कटतेने व्यक्त कराव्यात का नाही हा प्रश्ण मनात निर्माण होतो.... खोल जपलेली प्रत्येक भावना व्यक्त नाही झाली तरी अस्वस्थता जाणवतं रहाते हे त्याचचं लक्षण नाही का???ती भावना व्यक्त करताना जर समोरची व्यक्ती तितक्याच उत्कटतेने तो भाव जाणू शकली तर सोन्याहून पिवळं.....!!!! पण जर नाही जाणू शकली तर मात्र कायम एक बोच मनात रहाते की आपण ज्या व्यक्तीला विश्वासाने, हक्काने काही सांगू इच्छितो पण ती व्यक्ती त्यापासून कोसों दूर आहे या भावविश्वापासून.... तिला आपली साद ऐकू जात नाही....आणि उरते फक्त खोलवर निराशा.... संवाद तुटल्याची भावना.....अधूरा रहाणारा संवाद....सहजपणे निर्माण झालेला उत्कट भाव; आणि तितक्याच सहज अधुरा राहिलेला तो संवाद........ कधीच पुर्ण न होणारा......!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा