रविवार, १३ मार्च, २०११

प्रत्येकाने असतं नात एक जपलेलं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
ओल्याचिंब आठवणींनी खोल मनात दडलेलं...
कातरक्षणी डोळ्यात पाणी आणणारं..
रात्रीच्या समयी स्वप्नांच्या कुशीत शिरणारं..

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
नकळत का होईना स्वतःशी जोडलेलं..
बेभान होताना भानावर आणणारं..
साद घालताच, हातात हात घेणारं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
विस्मृतीत जाऊ म्हणता जाऊ न शकलेलं..
भावस्पर्शातून हळुवार अलगद स्मरणारं..
स्मरता स्मरता मनात चांदण फुलवणारं..

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
नात्याच्या गुंत्यात कधी न गुंतलेलं...
जगण्याच्या वाटेवर दिलासा देणार..
कुणासाठी तरी काळजी करू लागणार..

प्रत्येकाने असतं नात एक जपलेलं...
मैत्री आणि प्रेमाच्या भावनेनं खुललेलं..
जाणत असून सुद्धा अजाणत बनलेलं...
बोलता बोलता अचानक अंतर्मुख होणारं...

प्रत्येकाने असतं नातं एक जपलेलं...
आयुष्याच्या धावपळीत कधी न हरवलेलं..
क्षणाच्या भेटीत युगांचा आनंद देणारं..
हुरहुरत्या क्षणी काळीज चिरत जाणारं..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा